Cover of आसिफजाही खंड १
आसिफजाही खंड १

सरफराज अहमद

हैदराबादची आसिफजाही सत्ता — दखनेतील अखेरची मुस्लिम राजवट. ‘निजामशाही’ म्हणून ओळखली जाणारी ही सत्ता केवळ राजकीय इतिहासापुरती मर्यादित नाही; तर दखनेच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि स्थापत्य परंपरेवर खोलवर प्रभाव टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक कालखंड आहे. आसिफजाही घराण्याने दखनेच्या सांस्कृतिक विकासाला सातत्याने चालना दिली. कला, साहित्य, शिक्षण, स्थापत्य आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून या सत्तेने दखनेच्या इतिहासात स्वतंत्र ठसा उमटवला. त्यामुळेच आसिफजाही राजवटीच्या इतिहासाशी संबंधित साधनसामग्री मराठी वाचकांसमोर आणण्याच्या उद्देशाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. आठ खंडांमध्ये प्रकाशित होणारा हा प्रकल्प आसिफजाही सत्तेच्या राजकीय घडामोडी, सांस्कृतिक वारसा, सामाजिक परिवर्तन आणि ऐतिहासिक दस्तावेजांचा सखोल आढावा घेणार आहे. दखनेच्या इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण अध्याय मराठी भाषेत अभ्यासक आणि वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे.

Cover of अमीर खुसरो दारा शुकोह प्रवास एका इतिहासाचा
अमीर खुसरो दारा शुकोह प्रवास एका इतिहासाचा

सरफराज अहमद

सरफराज अहमद यांनी मध्ययुगीन इतिहासाविषयी लिहीलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. ज्यामध्ये इब्राहीम आदिलशाह, दारा शुकोह, मराठवाड्याच्या इतिहासाची साधने या विषयावरील लेखांचा समावेश आहे.

Cover of टिपू सुलतान पत्रसार संग्रह
टिपू सुलतान पत्रसार संग्रह

सरफराज अहमद

दखनेच्या वसाहतविरोधी संघर्षाचा इतिहास लिहिला जातो, तेव्हा टिपू सुलतान हे नाव मध्यवर्ती ठरते. टिपू सुलतानचा संघर्ष केवळ रणांगणापुरता मर्यादित नव्हता; तो राजकारण, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, संस्कृती आणि सामाजिक व्यवस्थेपर्यंत विस्तारलेला व्यापक प्रतिकार होता. इंग्रजी वसाहतवादाच्या वाढत्या विस्ताराला रोखण्यासाठी टिपूने उभा केलेला लढा हा दखनेच्या स्वायत्ततेसाठीचा निर्णायक संघर्ष होता. यामुळेच इंग्रज सत्तेने टिपूवरील विजयाला केवळ एका राजाचा पराभव मानले नाही, तर भारतातील आपल्या वर्चस्वाच्या स्थापनेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानले. टिपू सुलतानचा पराभव म्हणजे भारतीय उपखंडातील वसाहती सत्तेच्या विस्ताराचा नवा अध्याय, अशी त्यांची धारणा होती. टिपू सुलतानच्या इतिहासाचा अभ्यास करताना तत्कालीन पत्रव्यवहार, राजकीय नोंदी आणि प्रशासकीय दस्तावेज यांना अत्यंत महत्त्व प्राप्त होते. इतिहासाच्या अभ्यासासाठी आधारभूत ठरणारी ही महत्त्वपूर्ण पत्रे प्रथमच मराठी भाषेत प्रकाशित करण्यात आली असून, दखनेच्या वसाहतविरोधी संघर्षाचा एक नवा आणि अस्सल संदर्भ या माध्यमातून वाचकांसमोर येत आहे.